राजनगाव, 05 एप्रिल: राज्य मंत्रिमंडळाच्या जवळपास 250 बैठका झाल्या पण धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत या सरकारने एकही शब्द काढला नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. या उलट धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांचे प्रश्न सातत्याने संसदेत मांडल्याचे त्यांनी सांगितले. दौंड तालुक्यातील राजनगाव येथे एका सभेत त्या बोलत होत्या.
राज्यातील आणि केंद्रातील सरकार असंवेदनशील आहे. इतक नव्हे तर हे सरकरा महिलांच्या, शेतकऱ्यांच्या आणि युवकांच्या विरोधातील असल्याचा आरोप त्यांनी केला. मला खासदारकी घरात वेळ जात नाही म्हणून मिळाली नाही. तर जनतेची सेवा करायची होती, जनतेच्या आयुष्यात बदल करायचा होता म्हणून मी खासदारकी लढल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
निवडणुकीच्या काळात टोकाची भूमिका घ्यावी. मतभेद असतात. पण एकदा निवडूण आल्यानंतर भागाचा विकास हाच एक ध्यास घेऊन गेल्या दहा वर्षाचा मी लेखाजोखा घेऊन आल्याचे सुळे म्हणाल्या. माझी लढाई सत्य विरुद्ध असत्याची आहे. मी सत्याच्या बाजूने आहे. या राज्यात आणि देशात जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तोपर्यंत कोणालाही मराठी शाळा बंद करु देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुक 2019
लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील.
11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार-
वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम
18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान-
बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर
23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान
जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान
नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी
लोकसभा निवडणूक 2014
महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या.
महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल
एकूण जागा 48
भाजप 23
सेना 18
राष्ट्रवादी काँग्रेस 4
काँग्रेस 2
स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1
VIDEO : राहुल गांधींच्या समोर भुजबळांनी केली मोदींची मिमिक्री