मुंबई, 22 फेब्रुवारी : 2019 साली देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सकाळी झालेल्या या शपथविधीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. अजित पवारांसोबत झालेल्या या शपथविधीबद्दल शरद पवारांशी चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या या गौप्यस्फोटावर अजित पवारांनी बोलायला नकार दिला असला तरी आता शरद पवार मात्र समोर आले आहेत.
'आता अजित पवारांनी बोलायची गरज काय? पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? समजेन वाले को इशारा काफी है,' असं सूचक विधान शरद पवारांनी केलं. शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या मान्य केलं की पहाटेचा शपथविधी ही राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीची खेळी होती.
फडणवीसांची प्रतिक्रिया
शरद पवारांच्या या विधानावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'शरद पवारांनी खुलासा केलेला आहे, चांगलं आहे. राष्ट्रपती राजवट का लागली? कुणाच्या सांगण्यावरून लागली, त्याच्यामागे कोण होतं? याचे उत्तर दिले तर सर्व कड्या जुळतील आणि सगळ्यांच्या समोर सगळं येईल,' असा गुगली देवेंद्र फडणवीस यांनी टाकला आहे.
जयंत पाटलांचाही तोच दावा
याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही राज्यातली राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीची शरद पवारांची ती खेळी असू शकते, असं जयंत पाटील म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Devendra Fadnavis, Sharad Pawar