राज्यात कहर सुरूच पण; 10 हजार लोकांनी कोरोनावर केली मात
राज्यात कहर सुरूच पण; 10 हजार लोकांनी कोरोनावर केली मात
कोरोना विषाणू मेंदू, पाठीची हाडं, मज्जातंतू आणि स्नायूंसह संपूर्ण मज्जासंस्थेस प्रभावित करतात. डॉक्टर कोरालनिक म्हणतात की, कोव्हिडच्या वेगवेगळ्या मार्गांनी न्यूरोलॉजिकल डिसफंक्शन होऊ शकतं. हा रोग विशेषत: फुफ्फुस, मूत्रपिंड आणि हृदयावर अधिक परिणाम करतो. पण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचा मेंदूवरही परिणाम होतो.
राज्यात दिवसभरात कोरोनाव्हायरसमुळे 65 मृत्यू झाले. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींची संख्या वाढत असली तरी दिलासादायक बाब म्हणजे, कोरोनावर मात केलेल्यांची संख्या 10000 वर पोहोचली आहे.
मुंबई, 20 मे : राज्यात कोरोनाव्हायरस (Coronavirus) चा कहर वाढत असला, तरी एक दिलासादायक आकडा आज समोर आला आहे. आतापर्यंत राज्यातल्या 10,318 लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. गेल्या 24 तासात 679 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशभरात राज्याचा कोरोनाच्या रुग्णसंख्येत पहिला क्रमांक आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राज्यापेक्षा महाराष्ट्रात तिप्पट रुग्ण आहेत. तरीही रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढत आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणता येईल. बुधवारी संध्याकाळी राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीत राज्यात दिवसभरात 65 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. त्यातले 41 मुंबईतले,नवी मुंबईतले 3, उल्हासनगर 2, पुण्यातले 13, पिंपरी चिंचवड 2,औरंगाबाद - 2, सोलापूर - 2 असे रुग्ण दगावले आहेत. आज राज्यात 2250 रुग्णांचं नव्याने निदान झालं.
2250 new #COVID19 cases & 65 deaths reported in Maharashtra today. Total number of cases in the state is now at 39297, including 27581 active cases and 1390 deaths: State Health Department pic.twitter.com/kzb8rUQER9
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.