मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कांद्यानं आणलं शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, 300 क्विंटल पिकावर जेसीबी फिरवण्याची वेळ,Video

कांद्यानं आणलं शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, 300 क्विंटल पिकावर जेसीबी फिरवण्याची वेळ,Video

X
शेतकऱ्यानं

शेतकऱ्यानं कांद्यावर थेट जेसीबी फिरवला आहे.

एक लाख रुपये खर्च करून पिकवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव आल्यानं शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Chhatrapati Sambhaji Nagar [Chhatrapati Sambhaji Nagar], India

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर, 26 मे : गारपीट आणि अवकाळी पावसामुळे राज्यभरातले शेतकरी सध्या त्रस्त झाले आहेत. हवामानातील बदलामुळे हाता-तोंडाशी आलेलं पिक गेल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानं यामुळे निराश होत टोकाचं पाऊल उचललं आहे.

संभाजीनगरजवळच्या सुलतानपूर शिवारात राहणाऱ्या किशोर वेताळ या शेतकऱ्यानं काही दिवसांपूर्वी त्यांच्या दोन एकर शेतीमध्ये कांद्याचं पिक घेतलं होतं. हे पिक घेण्यासाठी त्याने तब्बल एक लाख रुपये खर्च केले. वेताळ यांनी केलेल्या कष्टामुळे त्यांच्या शेतामध्ये तब्बल 300 क्विंटल कांदा पिकवला.

अवकाळी पावसानंतर त्यांच्या शेतीमधील कांद्याला मोठा फटका बसला. त्यानंतरही त्यांनी मजूर लावून कांद्याची काढणी केली. किमान लागवड केलेले पैसे तरी परत मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती. पण कांद्याला अवघा 3 रुपये किलो भाव मिळत असल्यानं वेताळ चांगलेच निराश झाले होते. मोठ्या कष्टामुळे पिकवलेल्या कांद्यला कवडीमोल भाव मिळत असल्यानं संतापलेल्या वेताळ यांनी टोकाचं पाऊल उचललं.

खर्च केले 4 लाख अन् हाती आले 2 रुपये, हतबल शेतकऱ्याने पिक तसेच सोडून दिले! Video

त्यांनी आपल्या शेतामधील कांद्यावर चक्क जेसीबी फिरवला. 'मी एक लाख रुपये खर्च करून दोन एकर मध्ये कांदा लावला होता. पाऊस पडल्यामुळे माझ्या कांद्याला भाव नाही.  तीन रुपये किलोने कांद्याची विक्री होत आहे. त्यामुळे मला हे कांदा नष्ट करावा लागला आहे, अशी प्रतिक्रिया वेताळ यांनी दिली.

First published:
top videos

    Tags: Chhatrapati Sambhaji Nagar, Farmer, Local18, Onion