• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • BREAKING :11.30 वाजेपर्यंत राज्यावर पावसाचे मोठे संकट, कोकण ते विदर्भापर्यंत सतर्कतेचा इशारा

BREAKING :11.30 वाजेपर्यंत राज्यावर पावसाचे मोठे संकट, कोकण ते विदर्भापर्यंत सतर्कतेचा इशारा

 weather alert : नाशिक, सातारा, कोल्हापूर, कोकण, उस्मानाबाद जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

weather alert : नाशिक, सातारा, कोल्हापूर, कोकण, उस्मानाबाद जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

weather alert : नाशिक, सातारा, कोल्हापूर, कोकण, उस्मानाबाद जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • Share this:
    मुंबई, 07 सप्टेंबर : राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मराठवाडा आणि विदर्भात पावसाने हाहाकार माजवला आहे. हवामान खात्यानेही पुढील रात्री 11.30 वाजेपर्यंत सतर्कतेचा इशारा ( weather alert) दिला आहे. राज्यात महापूर आणि माती वाहून जाण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. (Heavy rains in the maharashtra) मराठवाड्यासह राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. आता पुढील काही तास हे महाराष्ट्रासाठी चिंतातूर  असणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठिकाणी नद्यांना महापूर येण्याची भीती वर्तवली जात आहे. तसंच, काही ठिकाणी माती वाहून जाण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी खबरदारी घेण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

    'आमिर मला चांगला अभिनेता समजत नाही'; भाऊ फैजलने व्यक्त केली खंत

    नाशिक, सातारा, कोल्हापूर, कोकण, उस्मानाबाद जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. रात्री 11.30 वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, नदी आणि तलाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
    Published by:sachin Salve
    First published: