हेही वाचा..ऊसतोड मजुरांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा, धनंजय मुंडेंनी केलं ट्वीट ऊसतोड कामगारांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, आता शांत आणि समाधानी वाटत आहे. माझे लोक घरी जातील. ऊसतोड कामगारांचा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष संपला आहे. त्यांच्या व्यथा, वेदनांना विराम मिळाला आहे. ते आता स्वतःच्या घरी जाऊ शकतील. प्रशासनाने त्यांना सुरक्षितपणे घराकडे पोहोचवावे. कामगारांनी देखील प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, आणि आपापल्या घरी सुखरूप पोहोचावे तसेच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. हेही वाचा..मुंबईत तैनात होती SRPFची तुकडी, 175 जवानांच्या संपूर्ण ग्रुपला केलं क्वारंटाईन लॉकडाऊनमुळे राज्यात ठिकठिकाणी ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने अडकले आहेत. हे सर्व कामगार एकत्र असल्याने त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे त्यांची तपासणी करून सर्वांना सुरक्षितपणे घरी पाठवावे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी सातत्याने सरकारकडे लावून धरली होती. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करत होत्या. निर्णयास विलंब होत असल्याने त्या आक्रमक झाल्या होत्या. अखेर राज्यसरकारने ऊसतोड कामगारांच्या घरवापसीचा आदेश शुक्रवारी काढला. राज्य सरकारच्या आदेशाचं पंकजा मुंडे यांनी स्वागत केलं आहे. संपादन- संदीप पारोळेकरसरकारचे आभार आमच्या गरीब कष्टकऱ्यांच्या वेदनेला विराम दिला त्या बद्दल आभार..माननीय मुख्यमंत्री @CMOMaharashtra निर्णयाबद्दल व मा. खा. शरद चंद्र जी पवार @PawarSpeaks आणि ना. जयंत पाटीलजी आपण वेळोवळी चर्चा केली धन्यवाद आता कामगारांनी निश्चिन्त पणे नियमांचं पालन करून सुखरूप घरी जाव.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 17, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, पंकजा मुंडे beed news