मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मोठी बातमी : पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात अटकेत असलेल्या 89 आरोपींना न्यायालयाकडून दिलासा

मोठी बातमी : पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात अटकेत असलेल्या 89 आरोपींना न्यायालयाकडून दिलासा

ठाणे न्यायालयाने अटकेत असलेल्या 89 आरोपींची जामीनावर मुक्तता केली आहे.

ठाणे न्यायालयाने अटकेत असलेल्या 89 आरोपींची जामीनावर मुक्तता केली आहे.

ठाणे न्यायालयाने अटकेत असलेल्या 89 आरोपींची जामीनावर मुक्तता केली आहे.

ठाणे, 16 जानेवारी : पालघर मॉब लिंचिंग प्रकरणी ठाणे न्यायालयाने अटकेत असलेल्या 89 आरोपींची जामीनावर मुक्तता केली आहे. व्यक्तीगत प्रत्येकी जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. घटनेच्या वेळेस हे 89 आरोपी घटनास्थळी उपस्थित नव्हते. या कारणास्तव न्यायालयाने या आरोपींची जामीनावर मुक्तात केली आहे.

पालघर येथे गेल्या वर्षी 16 एप्रिलला साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरला बेदम मारहाण करण्यात आली होती. मुंबईहून सुरतला दोन साधू आपल्या गाडीने जात होते. त्या दरम्यान पालघर मधील गडचिंचले गावातील गावकऱ्यांनी या दोन साधूंना मुलं चोरणारे चोर समजून मारहाण करण्यास सुरुवात केली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

24 डिसेंबर 2020 रोजी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीआयडीने या प्रकरणी 19 लोकांना अटक केली होती. त्यांनंतर या आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठवले, तर 4 अल्पवयीन मुलांना देखील या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आतापर्यंत या प्रकरणात 248 जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 105 जणांना जामीन देण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

16 एप्रिल 2020 रोजी कांदिवली येथील सुशीलगिरी महाराज, वाहन चालक निलेश तेलगडे आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे पुजारी कल्पवृक्षगिरी महाराज हे लॉकडाउनच्या काळात गुजरातकडे चालले होते. चालकाकडे प्रवासाठीचा कोणताही पास नसल्याने त्यांना चारोटी टोलनाका येथून पोलिसांनी माघारी पाठवले. म्हणून ते माघारी फिरून आड मार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास पोहोचले. मात्र, त्याठिकाणी वनविभागाच्या चौकीजवळ जमलेल्या एका जमावाने या तिघांची गाडी अडवली आणि चोर समजून दगड, कोयते, काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली.

जमावानं त्यांची कारही पलटी केली. गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस आपल्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या तिघा जखमींना कारमध्ये बसवून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव शेकडोंच्या संख्येने असल्याने तिथं उपस्थित चार पोलिसांचे काहीच चालले नाही. जमाव अधिकच आक्रमक झाला आणि त्यांनी थेट पोलिसांवरही हल्ला चढवला. या घटनेतून पोलिसांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली. मात्र, त्या तीन जणांची जमावाने दगड, काठ्या, कोयत्याने वार करुन निर्घृणपणे हत्या केली. या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते.

First published:
top videos

    Tags: Palghar