तसंच, 'राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या काही ज्या सूचना आहे. त्यांचा विचार केला जाईल. बच्चू कडू यांनी जे आरोप केले त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल', असंही भुसे यांनी स्पष्ट केले. परंतु, बच्चू कडू यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये पहिल्यांदाच दोन मंत्री आमनेसामने आल्याचे पाहण्यास मिळाले. काय म्हणाले होते बच्चू कडू? 'ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. त्याची लगेच पाहणी करून पंचनामे केले जाणार आहे. पंचनामे केल्यानंतर तातडीने मदत दिली जाणार आहे. यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे. जे पेरले ते उगावले नाही आणि हातात जी पिकं हातात आली, ती मेलेली होती, त्यामुळे राज्य सरकारमधील कृषी खाते हे झोपलेले आहे का? असा सवाल बच्चू कडूंनी उपस्थितीत केला होता.कृषी विभागाच्या कारभाराबाबत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या आरोपांबाबत राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांचा खुलासा pic.twitter.com/6pLILUf8Yq
— News18Lokmat (@News18lokmat) August 23, 2020
'जेव्हा बियाणे तयार होते तेव्हा त्यात काही बदल केले जातात की काय असा संशय आहे. सरकारच्या महाबीज कंपनीने 2 ते 3 हजार रुपयात बाजारातीलच निकृष्ट दर्जाचं बियाणे घेऊन शेतकऱ्यांना 8 हजार रुपये भावानं विकले असावे', असा आरोपही बच्चू कडू यांनी केला होता. तुकाराम मुंढेंचा आदेश मोडीत, राज्य सरकारने दिला नागपूरकारांना मोठा दिलासा तसंच, 'गेल्या 50 वर्षांपासून हेच सुरू आहे. त्यामुळे बोगस बियाणे बनवणाऱ्या कंपनीच्या मालकांनाच चोपल पाहिजे' असे म्हणत बच्चू कडूंनी आपल्या स्टाईलने कंपन्यांना इशारा दिला.राज्यातील कृषी खाते झोपले की काय? राज्यमंत्री बच्चू कडू यांचा सरकारला घरचा अहेर pic.twitter.com/CLQqTPVTAT
— News18Lokmat (@News18lokmat) August 23, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.