नितीन कुमार, प्रतिनिधी
उदगीर आगाराची बस आगारातून चाकूरकडे रवाना झाली होती. दरम्यान, बस हैबतपूर पाटीच्या पुढे आल्यावर तुळजापूर येथून दर्शन घेऊन परत उदगीरकडे येणारी कार बसला समोरुन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील पाचजण जागेवरच ठार झाले. तर बसमधील दहाजण जखमी झाले असून त्यांना उदगीर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
या अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली. तसंच घटनास्थळी उदगीर ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य केलं. सर्वांनी मिळून बचाव कार्यास प्रारंभ केला. काही जखमींना प्रथमोपचार दिले गेले. दरम्यान सद्यस्थितीत पाच जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. अद्याप मृतांची ओळख पटली नसून अपघातास्थळी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
पुण्याहून चार मित्र फिरायला रत्नागिरीला गेले, मात्र, गावखडी समुद्रात घडला धक्कादायक प्रकार
मंगळवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असल्याचं समोर येत आहे. उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेले आहेत. तर, जखमींवर उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Major accident, Road accident