मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /रक्तातील साखर कमी करून मधुमेह ठेवतील नियंत्रित! चमत्कारिक आहेत ही 3 पानं

रक्तातील साखर कमी करून मधुमेह ठेवतील नियंत्रित! चमत्कारिक आहेत ही 3 पानं

एनसीबीआयच्या अहवालानुसार जगातील 5 टक्के लोकसंख्या डायबेटिसने ग्रस्त आहे. डायबेटिस ही एक अतिशय गुंतागुंतीची स्थिती आहे, ज्यामध्ये हृदय, ब्लड प्रेशर, किडनी, डोळे या अवयवाशी संबंधित आजार होतात.

एनसीबीआयच्या अहवालानुसार जगातील 5 टक्के लोकसंख्या डायबेटिसने ग्रस्त आहे. डायबेटिस ही एक अतिशय गुंतागुंतीची स्थिती आहे, ज्यामध्ये हृदय, ब्लड प्रेशर, किडनी, डोळे या अवयवाशी संबंधित आजार होतात.

एनसीबीआयच्या अहवालानुसार जगातील 5 टक्के लोकसंख्या डायबेटिसने ग्रस्त आहे. डायबेटिस ही एक अतिशय गुंतागुंतीची स्थिती आहे, ज्यामध्ये हृदय, ब्लड प्रेशर, किडनी, डोळे या अवयवाशी संबंधित आजार होतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 23 मार्च : जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगातील सुमारे 42.2 कोटी लोक डायबेटिसने ग्रस्त आहेत. यासोबतच दरवर्षी 15 लाख लोकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे डायबेटिसमुळे मृत्यू होतो. या बाबतीत भारताची स्थिती अत्यंत वाईट आहे. सध्या भारतात सुमारे 8 कोटी लोकांना डायबेटिस आहे आणि अंदाजानुसार 2045 पर्यंत भारतातील 13 कोटींहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त असतील. त्यामुळे भारताला कॅपिटल ऑफ डायबेटिस म्हटलं जातंय.

    डायबेटिस हा लाइफस्टाइलशी संबंधित आजार आहे आणि या स्थितीत रक्तातील साखरेची पातळी म्हणजेच ब्लड शुगर लेव्हल वाढते. पण लाइफस्टाइल सुधारली तर त्यातून रक्तातील साखरेचं वाढतं प्रमाण कमी होऊ शकतं. एनसीबीआयच्या एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की काही औषधी वनस्पतींची पानं चावून खाल्ल्यास इन्शुलिनचं उत्पादन वाढवून ब्लड शुगर कंट्रोल केली जाऊ शकते.

    उन्हाळ्यात रोज खा हे 4 धान्य, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलही राहील नियंत्रित!

    1. अॅलोव्हेराची पानं

    भारतात क्वचितच कोणी असेल ज्याला कोरफड म्हणजेच अॅलोव्हेराबद्दल माहिती नसेल. अॅलोव्हेरा ही भारतातील एक विशेष औषधी वनस्पती मानली जाते. आता हे NCBI म्हणजेच अमेरिकन नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या संशोधनातही सिद्ध झाले आहे. एनसीबीआयच्या अहवालानुसार, अॅलोव्हेरामध्ये हायपोग्लायसेमिक गुणधर्म आहेत. म्हणजेच रक्तातील साखर कमी करण्याची क्षमता त्यात आहे. अॅलोव्हेराची पानं सकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्यास इन्शुलिनचे उत्पादन वाढू शकते, ज्यामुळे रक्तातील साखर आपोआप नियंत्रित होऊ शकते.

    2. सीताफळाची पानं

    सीताफळ हे अतिशय चविष्ट फळ आहे पण त्याची पानंही खूप गुणकारी आहेत. एनसीबीआयच्या संशोधनानुसार सीताफळाच्या पानांमध्ये डायबेटिसविरोधी गुणधर्म असतात. या पानांमध्ये फोटोकॉन्स्टिट्यूंट गुणधर्म असतात ज्यामुळे इन्शुलिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच, हे हायपोग्लायसेमिक क्षमतेसह रक्तातील साखर कमी करते.

    3. कडूनिंबाची पानं

    कडूनिंबामध्ये अँटिफंगल, अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात, परंतु NCBI च्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे की कडूनिंबची पानं डायबेटिसदेखील नियंत्रित करू शकतात. सकाळी लवकर कडूनिंबची पाने चघळल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण वाढत नाही आणि पॅन्क्रियाज आपले काम योग्य प्रकारे करते, त्यामुळे नैसर्गिक प्रक्रियेद्वारे इन्शुलिन तयार होते. कडुनिंबाच्या पानांमध्ये अशी अनेक संयुगे आढळून आली आहेत, जी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

    Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी काय खाणं आहे उत्तम? पनीर की चिकन

    First published:
    top videos

      Tags: Diabetes, Health, Health Tips, Lifestyle