मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Chanakya Niti: अतिविचारी लोकांच्या नशिबी केवळ अडचणींच्या राशी

Chanakya Niti: अतिविचारी लोकांच्या नशिबी केवळ अडचणींच्या राशी

चाणक्य यांनी सांगितलेल्या नीति आजही जीवन जगतांना उपयोगात येतात.

चाणक्य यांनी सांगितलेल्या नीति आजही जीवन जगतांना उपयोगात येतात.

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी सांगितलेल्या नीतीनुसार (Niti) प्रमाणापेक्षा जास्त विचार करणाऱ्या लोकांना दु:खच भोगावं लागतं.

दिल्ली,25 जून:चाणक्य (Chanakya) हे एक कुशल राजकारणी,चतुर मुत्सद्दी,कुटनिती तज्ज्ञ,अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य (Kautilya) म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या नीति  कठीण काळामध्ये (Difficult Time)व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात.चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी (Bad Things)ओळखण्याची क्षमता(Capacity)येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही (peaceful life)जगता येतं.त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं.

खरोखरच सुखी, संपन्न, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर चाणक्यनीति नुसार आयुष्य जगा.

चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलं आहे. आयुष्यात येणारी आर्थिक संकटं, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री, शत्रु या सगळ्यांबद्दल आचार्य चाणक्य यांनी काहीनाकाही भाकीतं करून ठेवलेली आहेत.

आचार्य चाणक्य यांच्या मते अति विचाराने आयुष्यामध्ये अंधार पसरतो हा अंधार रात्रीच्या अंधारापेक्षा नुकसानदायक असतो. अतिविचारी लोकांपेक्षा आंधळी लोक परवडतात असं आचार्य चाणक्य सांगतात.

(या तारखेला जन्मलेल्यांना मिळतं खरं प्रेम; कधीच सतावत नाही चिंता)

प्रत्येकालाच आयुष्यामध्ये काही संकटांचा सामना करावा लागतो. पण, काही लोक चांगल्या विचारांनी संकटांवर मात करतात तर, काही लोक कितीही प्रयत्न केले तरी अडचणी मधून बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळेच आचार्य चाणक्य सांगतात ज्याचे चांगले विचार असतात तेच आयुष्यामध्ये यशस्वी होतात.

(प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात ‘या’ 4 राशींचे लोक)

मात्र, जे लोक मनाने सतत वाईट विचार करत राहतात. ते स्वतः बरोबर दुसऱ्यांचंही नुकसान करतात. अशा लोकांच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतात. यांच्याकडे अडचणी करण्याची तोंड देण्याची ताकद नसते त्यामुळे हे लोक कायम दुसऱ्यांवर अवलंबून राहतात.

(Chanakya Niti: दोन तर्‍हेचे लोक आयुष्यभर राहतात दुःखी; कधीच मिळत नाही यश)

अशा लोकांच्या मनामध्ये विचारांचा द्वंद्व सतत सुरू असतं आणि त्यांना स्वतःच्या विचारांवर नियंत्रणही मिळवता येत नाही. त्यामुळे त्यांच्यामनात चांगले विचार मनात आले तरी त्यांचा उपयोग यांना आयुष्यात करता येत नाही. त्यामुळे आचार्य चाणक्य सांगतात अतिविचारी स्वभाव घातक असतो. जास्त विचार करण्यापासून दूर राहिले पाहिजे नाहीतर आपला आयुष्य अंधारात बुडतं.

(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:

Tags: Acharya chanakya, Chanakya niti