या आधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनीही विजयादशमीच्या दिवशी चीन आणि पाकिस्तानला कडक इशारा दिला होता. चीनसह एलएसीवर सुरू असलेल्या तणावादरम्यान डोभाल यांनी संतांच्या एका सभेला संबोधित करताना सांगितले की, भारत नव्या पद्धतीने विचार करतो आणि आम्ही भारतातच नाही तर परदेशातील जमिनीवरही लढू. आम्हाला जेथेही संकट दिसेल..आम्ही तेथे प्रहार करू. डोभाल उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील परमार्थ निकेतन आश्रमातील उपस्थितांना संबोधित करीत होते. ते यावेळी म्हणाले की, आम्ही यापूर्वी कोणावरही आक्रमण केलं नाही. याबाबत सर्व देशांचे स्वत:चे विचार आहेत. मात्र देशाचा बचाव करणे आवश्यक आहे. जेथे संकट आहे, धोका आहे तेथे आम्ही संघर्ष करू आणि देशाचं रक्षण करू.India won't accept shifting of LAC, China paying for its Ladakh misadventure: CDS Gen Bipin Rawat
Read @ANI story | https://t.co/lSCkvTAZx7 pic.twitter.com/YF07NnQuPZ — ANI Digital (@ani_digital) November 6, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India china