मराठी बातम्या /बातम्या /explainer /हवामान बदलामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होतेय! संधोधनातून आणखी धक्कादायक खुलासे

हवामान बदलामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होतेय! संधोधनातून आणखी धक्कादायक खुलासे

हवामान बदलाचा (Indian Children) भारतीय मुलांवर (Indian Children) पर वाईट परिणाम होत आहे. बनारस हिंदू विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, वातावरणातील बदलामुळे मुले संसर्गजन्य रोगांना (Infectious Disease) बळी पडत आहेत. तापमान, आर्द्रता यांसारख्या घटकांचा मुलांच्या आजारांशी संबंधांवर केलेल्या या अभ्यासात असे आढळून आले आहे की, या घटकांच्या वाढीमुळे मुलांना अधिक आजार होऊ लागतात.

हवामान बदलाचा (Indian Children) भारतीय मुलांवर (Indian Children) पर वाईट परिणाम होत आहे. बनारस हिंदू विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, वातावरणातील बदलामुळे मुले संसर्गजन्य रोगांना (Infectious Disease) बळी पडत आहेत. तापमान, आर्द्रता यांसारख्या घटकांचा मुलांच्या आजारांशी संबंधांवर केलेल्या या अभ्यासात असे आढळून आले आहे की, या घटकांच्या वाढीमुळे मुलांना अधिक आजार होऊ लागतात.

हवामान बदलाचा (Indian Children) भारतीय मुलांवर (Indian Children) पर वाईट परिणाम होत आहे. बनारस हिंदू विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, वातावरणातील बदलामुळे मुले संसर्गजन्य रोगांना (Infectious Disease) बळी पडत आहेत. तापमान, आर्द्रता यांसारख्या घटकांचा मुलांच्या आजारांशी संबंधांवर केलेल्या या अभ्यासात असे आढळून आले आहे की, या घटकांच्या वाढीमुळे मुलांना अधिक आजार होऊ लागतात.

पुढे वाचा ...

मुंबई, 15 डिसेंबर : हवामान बदलाचा (Climate Change) मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर अनेक अभ्यास होत आहेत. यात फक्त मुलांवर लक्ष केंद्रित करणारे फार कमी आहेत. असाच एक अभ्यास भारतातील उत्तर प्रदेशातील बनारसमध्ये करण्यात आला आहे. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी (BHU) च्या संशोधकांना या अभ्यासात असे आढळून आले आहे की, वातावरणातील बदलामुळे मुलांना संसर्गजन्य रोगांचा धोका निर्माण होत आहे. हे संशोधन मुलांवर अधिकाधिक व्यापक पर्यावरणीय अभ्यासाची गरज अधोरेखित करते. या अभ्यासाचे निष्कर्ष संयुक्त राष्ट्रांच्या आंतरशासकीय पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) च्या या वर्षीच्या अहवालात व्यक्त केलेल्या चिंतेशी सुसंगत असल्याचे मानले जाते.

मुले आणि रोग यांच्यातील संबंध

या अभ्यासात असे आढळून आले आहे की मुलांमधील एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 9 ते 18 टक्के हवामान घटकांचा परिणाम आहेत. इंडिया टुडेच्या अहवालानुसार, हा अभ्यास वाराणसी शहरातील 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये संसर्गजन्य रोग आणि हवामान घटकांमधील संबंध तपासण्यासाठी करण्यात आला होता.

मुलांना सर्वात जास्त फटका

गेल्या काही वर्षांत देशातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र, मानवाच्या हव्यासातून होणारा हवामान बदल हे या प्रयत्नांना सुरुंग लावू शकतो. त्याचवेळी, जागतिक स्तरावर केलेल्या मूल्यांकनात असे दिसून आले आहे की हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारांचा सर्वात जास्त फटका लहान मुलांना बसत आहे. यातही याचा सर्वात जास्त परिणाम गरीबांवर होतो.

तापमानाची मोठी भूमिका

जास्त तापमान आणि आर्द्रता हे मुलांमध्ये संसर्ग पसरवण्याचे मुख्य घटक असल्याचा निष्कर्ष सायन्स डायरेक्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासातून समोर आला आहे. संशोधकांना असे आढळले की कमाल तापमानात एक अंश वाढ झाल्यामुळे मुलांशी संबंधित कॉलरा आणि त्वचा रोगांचे प्रमाण अनुक्रमे 3.97 आणि 3.94 टक्क्यांनी वाढले.

रोग आणि हवामान घटक

या अभ्यासात वाराणसीतील 16 वर्षांखालील 461 मुलांचा समावेश करण्यात आला होता. आरके माल यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासात निधी सिंग, टी बॅनर्जी आणि अखिलेश गुप्ता यांचा समावेश होता. या अभ्यासात समाविष्ट असलेल्या घटकांमध्ये तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सौर विकिरण आणि वाऱ्याचा वेग यासारख्या हवामान घटकांचा समावेश आहे जो बनारसच्या मुलांमध्ये उदरातील वायूशी संबंधित रोग, श्वसन रोग, वेक्टर बोर्न आणि त्वचा रोग यासारख्या संसर्गजन्य रोगांशी संबंधित होता.

यंदाच्या वर्षी कोरोनाच नाही तर 'या' विषाणूंनीही हाहाकार उडाला होता!

हवामानाचा परिणाम किती?

अभ्यासात असेही आढळून आले आहे की एकूण संसर्गजन्य रोगांपैकी 9-18 टक्के हवामान घटक कारणीभूत आहेत. तर हवामान नसलेले घटक उर्वरित घटकांमध्ये योगदान देतात. भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, जे बहुतेक सर्दी आणि फ्लूसाठी कारणीभूत असतात आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन्समुळे रोगाचा 78 टक्के भाग असतो.

प्राथमिकताएं तय करने की जरूरत

सामाजिक आर्थिक परिस्थिती आणि बाल मानववंशशास्त्रामुळे हवामान आणि रोग यांच्यातील संबंध बदलले आहेत, अधिक मुले कमी वजनाच्या परिस्थितीला बळी पडत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. मंत्रालयाचे म्हणणे आहे की हा अभ्यास सरकार आणि धोरणकर्त्यांचे लक्ष वेधतो की त्यांनी बाल आरोग्यासाठी प्रभावी उपायांना प्राधान्य दिले पाहिजे. कारण सध्याचे हवामान-रोग संयोजन भविष्यात ओझे वाढवू शकते. यामध्ये भारतातील कुपोषित बालकांना सर्वाधिक त्रास होऊ शकतो.

पृथ्वीच्या जीवसृष्टीचे रक्षण करणाऱ्या एका महाकाय 'कवचा'चा शोध!

हा अभ्यास अशा वेळी आला आहे जेव्हा संयुक्त राष्ट्रांच्या आंतरशासकीय पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC) च्या या वर्षीच्या अहवालात दोन दशकांत पृथ्वी 1.5 अंश सेल्सिअसने गरम होईल असा इशारा दिला आहे. त्यामुळे उष्ण हवेच्या लाटा, उन्हाळ्याचे मोठे ऋतू आणि लहान थंड ऋतू पाहायला मिळतील.

First published:

Tags: Climate change, Rare disease, School children