परंतु गेल्या काही दिवसांपासून मालिकेत विविध बदल केले गेले आहेत. काही महिन्यांचा लीपसुद्धा घेण्यात आला होता. यांनतर मालिकेची कथा थोडी भरकटली होती. त्यामुळे या मालिकेची टीआरपीसुद्धा कमी आल्याच्या बातम्या येत होत्या. त्यांनतर आता ही मालिका बंद होणार असल्याची माहिती आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिका आपला निरोप घेत असल्याची कुणकुण आहे परंतु आता स्वतः अन्विता म्हणजेच स्वीटूने हे स्पष्ट केलं आहे.View this post on Instagram
स्वीटूची (अन्विता फलटणकर)पोस्ट- अभिनेत्री अन्विता फलटणकरने या मालिकेत स्वीटूची भूमिका साकारली होती. तर अभिनेता शाल्व किंजवडेकरने ओमची भूमिका साकारली होती. ओम आणि स्वीटूची जोडी आपली रजा घेणार असल्याने चाहते थोडेशे निराश आहेत. तर दुसरीकडे अन्वितानेसुद्धा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. अन्विताने आपले आणि ओमचे अर्थातच शाल्वचे दोन फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत अभिनेत्रीनं लिहिलं आहे, 'जिथे दुसरा अध्याय संपतो..' स्वीटूची ही पोस्ट पाहून चाहते भावुक झाले आहेत. शिवाय अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने कमेंट करत 'लव्ह यू' असं म्हटलं आहे.'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका येत्या १९ मार्च पासून आपला निरोप घेत आहे. आज मालिकेचा शेवटचा भाग शूट करण्यात आला. यावेळी सर्व कलाकार अतिशय भावुक झाल्याचं सांगितलं जात आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi entertainment, Zee marathi serial