मुंबई, 11 जुलै- वर्ल्ड कपच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भाराताच पराभव करत अंतिम सामन्यात आपलं स्थान पक्क केलं. टीम इंडियाच्या पराभवानंतर सोशल मीडियावर विराट कोहलीविरुद्धचा राग स्पष्ट दिसत आहे. संघाटा कर्णधार असूनही ही निर्णायक सामन्यात फक्त एक धाव करत तो बाद झाला होता. कोहलीच्या या परफॉर्मन्सनंतर क्रिकेट प्रेमी त्याला अनेक गोष्टी सुनवत आहेत. अभिनेता कमाल आर खानने (केआरके) त्याच्या मनातला राग ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला.
एवढंच नाही तर केआरकेने कोहलीला कर्णधारपद सोडण्याचाही सल्ला दिला. बुधवारी उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यानंतर केआरकेने सलग ट्वीट करत आपला राग व्यक्त केला. त्याने पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले की, 'टीम इंडियाचा सर्वात मोठी चूक ही होती की त्यांनी न्यूझीलंडला कमी लेखलं. त्यांना हा सामना आपण सहज जिंकू असंच वाटलं.' त्यानंतरच्या ट्वीटमध्ये त्याने लिहिले की, आम्ही जिंकू किंवा हरू चाहत्यांनी दोन्ही स्थितीत त्यांना पाठिंबा दिला पाहिदे असं विराट कोहली म्हणाला होता. पण भावा तू आम्हाला आधी हे सांग की आपण जिंकलो कधी होतो. तुला तर आयपीएलही जिंकता आलं नाही. तुला असं बोलायला पाहिजे की, तू एक सतत हरणारा खेळाडू आहेस आणि तरी लोकांनी तुला सर्वोत्तम खेळाडू म्हटलं आहे.
Actually The biggest problem of Indian team was that The players were considering #NewZealand team just nothing and they were believing to win the match like a Halwa. They didn’t know that New Zealand bowlers will make them cray for runs.#NZLvIND#ICCWC2019
So #Kohli said in the press conference that people should appreciate team for winning and loss both.
Bhai Aap Zara Ye Batado Ki Aap Jeete Kab Thai? You can’t even win #IPL. So you should say that you will always lose and ppl should still call you best player. Lol! #AaaThoo!
केआरकेने सामन्यानंतर विराट कोहलीच्या ट्वीटचाही चांगलाच समाचार घेतला. विराटने लिहिले होते की, 'ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, मी त्या सर्वांचे आभार मानतो. तुम्ही हे क्षण अविस्मरणीय केले. आपण सारेच निराश आहोत. समान भावनाच आपल्या मनात आहेत. आम्ही ते सर्व केलं जे आम्ही करू शकत होतो. जय हिंद.'
Means you can’t play better than this and you can never win #IPL also forget the World Cup. If you know very well that you are the worst captain in the history of Indian cricket then why don’t you leave captaincy? But then how will you get advertisements?https://t.co/OJcqd2dhk9
या ट्वीटवर कमेंट करताना केआरकेने लिहिले की, 'याचा अर्थ असा की तू याहून चांगलं खेळू शकत नाहीस. तू कधी आयपीएल जिंकू शकत नाही, मग वर्ल्ड कप तर विसरूनच जा. तुला हे माहीत असायला हवं होतं की इतिहासातला तू सर्वात वाईट कर्णधार आहेस. तू कर्णधार पद सोडून का नाही दे. पण जर तू असं केलंस तर तुला जाहिराती तरी कशा मिळतील.' एकीकडे केआरकेने टीम इंडियाचा समाचार घेतला असला तरी अनेक बॉलिवूड कलाकारांनी भारतीय संघाला पाठिंबा दिला आहे. यात अनुपम खेर, अमिताभ बच्चन, रणवीर सिंगच्या नावाचा समावेश आहे.