मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'RRR हा बॉलिवूड चित्रपट नाही...' गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर राजामौलींचं मोठं वक्तव्य

'RRR हा बॉलिवूड चित्रपट नाही...' गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर राजामौलींचं मोठं वक्तव्य

 एसएस राजामौली

एसएस राजामौली

एसएस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. राजामौली यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण, आता राजामौली यांच्या एका वक्तव्यावरून गदारोळ निर्माण होत आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 14 जानेवारी: एसएस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' या चित्रपटाने देशातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला भारतातील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तर रेकॉर्डब्रेक कमाई तर केलीच पण अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची देखील कमाई केली.  नुकत्याच झालेल्या 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात चित्रपटाने एक नवीन विक्रम केला. या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. राजामौली यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण, आता राजामौली यांच्या एका वक्तव्यावरून गदारोळ निर्माण होत आहे.

'नाटू नाटू'चे म्युझिक कम्पोजर एम एम केरावनी यांनी पुरस्काराच्या घोषणेनंतर मंचावर जाऊन ट्रॉफी घेतली त्यानंतर त्यांनी पुरस्कारासह फोटोसाठी पोजही दिली. संपूर्ण भारतीयांसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. पण त्यानंतर राजामौली यांचं एक वक्तव्य मात्र चांगलंच चर्चेत आहे आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

हेही वाचा - Ved Movie: 'वेड' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना रितेशला मात्र चाहत्याचा खोचक सल्ला

'रिपब्लिकवर्ल्ड. कॉम’शी संवाद साधताना राजामौली म्हणाले, “आरआरआर हा बॉलिवूड चित्रपट नाही, भारताच्या दक्षिण भागातील तो तेलुगू चित्रपट आहे जी आमची कर्मभूमी आहे. मी चित्रपटात गाण्यांचा वापर कथा पुढे घेऊन जाण्यासाठी करतो, चित्रपट मध्येच थांबवून गाणं आणि नाच याचा आस्वाद देणं मला पटत नाही. जर चित्रपट संपल्यावर जर लोकांना ३ तास कसे घालवले हे आठवत नसेल तरच तुम्ही स्वतःला एक यशस्वी फिल्ममेकर म्हणवून घेऊ शकता.”

View this post on Instagram

A post shared by SS Rajamouli (@ssrajamouli)

राजामौली यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. लोक राजामौली यांच्यावर टीका करत आहेत. त्याच बरोबर 'नाटू नाटू' हे गाणेही सामान्य म्हटले जात आहे. तसे, आम्ही तुम्हाला सांगतो की राजामौली यांनी प्रादेशिकतेच्या भावनेने असे म्हटलेले नाही. चित्रपट दिग्दर्शकाने आपल्या चित्रपटाची ओळख करून देताना याचा उल्लेख केला. लोकांनी त्याच्या बोलण्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. मात्र, संपूर्ण प्रकरण ऐकल्यानंतर संपूर्ण प्रकरण स्पष्ट होते.

बॉलीवूड आणि साऊथ चित्रपटांमधील फरक समजावून सांगण्यासाठी राजामौली म्हणतात, 'तुम्ही काहींनी भारतीय चित्रपट पाहिले असतील. त्यात गाणी आणि फाईट सिक्वेन्स आहेत. ते या चित्रपटातही पाहायला मिळेल. फरक एवढाच की तो बॉलीवूड चित्रपट नाही. हा एक तेलुगु चित्रपट आहे, जो दक्षिण भारतातून येतो, मी जिथून येतो. पुढे त्यांनी आपला मुद्दा स्पष्ट केला आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, अलीकडेच एसएस राजामौली यांच्या 'RRR' मधील 'नातू नातू' या गाण्याला 80 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याचा (मोशन पिक्चर) पुरस्कार मिळाला आहे. हे गाणे राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे ज्यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Entertainment, South film