आलिया पुढे म्हणाली, मी कधीच काहीच करू शकत नाही अशी जाणीव मला ते लोक रोज करुन देत असत. नवाझुद्दीनं मला कधीच इतर लोकांसमोर बोलू दिलं नाही. त्याने माझ्यावर कधी हात उचलला नाही मात्र त्याचं सतत वाद घालणं आणि मला ओरडणं, घालून-पाडून बोलणं या सगळ्याला आता मी वैतागले आहे. त्याच्या कुटुंबानंही माझं मानसिक आणि शारीरिक आणि मानसिक शोषण केलं. मागच्या अनेक वर्षांपासून मी हे सर्व सहन करत राहिले. लग्नाच्या नात्यात गरजेचा असलेला सन्मान मला नवाझुद्दीकडून कधीच मिळाला नाही. त्याच्या घरात याआधीच 4 घटस्फोट झालेले आहेत हा पाचवा घटस्फोट असेल आणि हे सर्व त्यांच्या लाइफचा भाग झालेलं आहे. लॉकडाऊनमध्ये सुश्मिता सेननं सांगितली तिची 'लव्ह स्टोरी', पाहा VIDEO
घटस्फोटानंतर आपल्या दोन्ही मुलांची कस्टडी आपल्याकडेच असावी अशी मागणी आलियानं केली आहे. ती म्हणाली, नावझुद्दीन अनेक महिने मुलांना भेटयला येत नाही. त्यांना वडील म्हणून वेळ देत नाही. एवढा मोठा स्टार असून काय उपयोग जर तुम्ही एक चांगली व्यक्ती होऊ शकत नाही. माझ्या मुलांना तर हे सुद्धा आठवत नाही की ते दोघं आपल्या वडीलांना शेवटचं कधी भेटले होते. या सगळ्याचा वडील म्हणून त्याला काहीच फरक पडत नाही आणि त्याच्या वागण्याची आता मुलांनाही सवय झाली आहे त्यामुळे माझी मुलं माझ्याकडेच राहावीत असं मला वाटतं. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर नावझुद्दीननं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भूटानमध्ये असं काय घडलं की, अनुष्काला अर्ध्या रस्त्यात सोडून पळून गेला विराटView this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood