स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी मालिका ‘आई कुठे काय करते’ मध्ये अनघा या भूमिकेने लोकांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे. ती अभिनेत्री म्हणून उत्तम आहेच मात्र माणूस म्हणून सुद्धा किती सुंदर आहे, याची प्रचिती कोरोना काळात येत आहे. अश्विनीने 2 वर्षांपूर्वी ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’ ची स्थापना केली आहे. या प्रतिष्ठानअंतर्गत ती विविध गरजू लोकांना मदतीचा हात देते.View this post on Instagram
सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. या काळात लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. सध्याची परिस्थिती नकारात्मक बनली आहे. अशा काळात माणुसकी जपणं खूप मोठी गोष्ट आहे. हीच माणुसकी जपत अभिनेत्री अश्विनीने कोरोना रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत अन्न देण्याचा वसा घेतला आहे. असं म्हणतात की, माणसाला सर्व सहन होतं मात्र भूक नाही त्यामुळेच या गरजू लोकांच्या तोंडात अन्नाचा घास भरवण्याचा अश्विनीचा हा निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे. हे वाचा - 'लव्ह लग्न लोचा' फेम अभिनेत्री रुचिता जाधव अडकली लग्नबंधनात.... पाहा PHOTO ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’ या अंतर्गत हे सामाजिक कार्य केलं जात आहे. खंडाळा, फलटण, शिरवळ, सातारा, केसुर्डी अशा अनेक शहरांसाठी हा उपक्रम राबविला जात आहे. अश्विनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये सर्व शहरांची आणि मोबाईल नंबरची यादी आहे. त्यामुळे आवश्यक त्या लोकांना संपर्क साधता येईल. हे वाचा - धक्कादायक! कोरोना बळींचं सत्र सुरूचं, 'बापमाणूस' फेम अभिलाषा पाटीलचं निधन... ‘आई कुठे काय करते’ आधी अश्विनीने ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे’ मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती. या मालिकेत ती ‘राणू आक्कासाहेब’ या भूमिकेत होती. ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरली होती.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Instagram post, Marathi actress, Marathi entertainment