मुंबई, 12 सप्टेंबर : राज्यासह देशभरातील कोरोनाचे अपडेट्स आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.ऑक्सफर्ड आणि अस्त्राझेनेकानं लसीच्या चाचण्यांना पुन्हा सुरुवातब्रिटनच्या आरोग्य विभागाची माहितीभारत बायोटेकच्या लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणीकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याची चिंता वाढलीराज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 10 लाख 37,765राज्यात आज कोरोनाच्या 22,084 नव्या रुग्णांची नोंदराज्यात सध्या 2 लाख 79 हजार 768 अॅक्टिव्ह रुग्णराज्यात आज दिवसभरात 391 रुग्णांचा मृत्यूराज्यात आज 13 हजार 489 रुग्णांना डिस्चार्जअ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या कोरोनाव्हायरस लशीच्या क्लिनिकल चाचण्या पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्या आहेत. या चाचण्या सुरक्षित असल्याची पुष्टी मेडिसिन्स हेल्थ रेग्युलेटरी ऑथॉरिटीने (एमएचआरए) दिल्याचं कंपनीने शनिवारी सांगितले. याबाबत रॉयटर्स आणि एएफपी या वृत्तसंस्थांनी माहिती दिली आहे.ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी समित्यांची स्थापनाजिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर समित्या -आरोग्यमंत्रीजिल्हास्तरावर कंट्रोल रूम सुरू -आरोग्यमंत्री राजेश टोपेआपत्कालिन परिस्थितीत 50 ड्युरा, 200 जम्बो सिलेंडर राखीवविभागीय आयुक्तांना निर्देश दिल्याची राजेश टोपेंची माहितीऑक्सिजनची प्रतिदिन आवश्यकता संकलित करण्याचे निर्देशअभिनेत्री कंगना राणावत घेणार राज्यपालांची भेटकंगना उद्या दुपारी 4.30 वा. राज्यपालांना भेटणारभाजप विरुद्ध शिवसेना वादात आता 'विहिंप'ची उडीकंगनावरील कारवाईवरून अयोध्येतल्या संतांचा संताप'उद्धव ठाकरेंनी अयोध्येत येऊ नये'विश्व हिंदू परिषदेसह हनुमानगढीच्या महंतांचा इशारा 'लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून...'मी माझे कार्य पुढे करत राहीन, कंगनाचं मराठीतून ट्विट'घाबरवण्याचा प्रयत्न केला तरीही धैर्यानं पुढे जात राहीन'जय हिंद, जय महाराष्ट्र - कंगना राणावतअभिनेत्री कंगनाबाबत आताची सर्वात मोठी बातमी अभिनेत्री कंगना राणावत घेणार राज्यपालांची भेटकंगनानं राज्यपालांकडे मागितली भेटीसाठी वेळउद्या कंगना आणि राज्यपालांची भेट होण्याची शक्यताबॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. उद्या ही भेट होण्याची शक्यता आहे. कंगनाचा महाराष्ट्र सरकारसोबत संघर्ष सुरू असतानाच तिने राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. उद्या ही भेट होणार का आणि या भेटीत नेमकी काय चर्चा होते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक माधव कोंडविलकर यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कविता, कथा, कादंबरी, आत्मकथन या प्रकारातून त्यांनी दलित, पीडित व उपेक्षित समूहाच्या व्यथा, वेदना व्यक्त केल्या आहेत. माधव कोंडविलकर यांच्यावर चार्वाक, भगवान बुद्ध , महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी आपल्या साहित्यातून पिढ्यानपिढ्या जातिभेदाच्या भिंतीत अडकलेल्या आणि भिंती तोडून मुक्त होऊ इच्छिणार्‍या दलित, कष्टकरी, श्रमिक वर्गाचे दु:ख मुखर केले आहे. मुंबई व कोकणातील दलित व कामगार वर्गाची होरपळ कोंडविलकरांनी आपल्या लेखनातून तीव्रपणे मांडलेली आहे.भिवंडी - दापोडातील आगीत 4 गोदामं जळून खाकइंडियन कॉर्पोरेशनमधील पेपरच्या गोदामांना आगगोदामं जळून खाक झाल्यानं लाखो रुपयांचं नुकसानअग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू'पलाश बोसनं कोलकाताहून केले होते धमकीचे फोन'मुंबई दहशतवादविरोधी पथकाची पत्रकार परिषदमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्याला अटक'मातोश्री' निवासस्थानी फोन करून दिली होती धमकीकोलकाता पोलिसांच्या मदतीनं धमकी देणाऱ्याला अटक'पलाश घोषनं कोलकाताहून धमकीचे फोन केले होते''अॅप वापरून राजकीय नेत्यांचे फोन नंबर मिळवले होते'शरद पवार, संजय राऊत यांनाही फोनवरून दिली धमकीगृहमंत्री अनिल देशमुखांनाही फोन करून दिली होती धमकीकोलकाता पोलिसांच्या मदतीनं धमकी देणाऱ्याला अटकधमकी देणारी व्यक्ती कोलकात्यात राहणारी -एटीएस'या व्यक्तीचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही'ही व्यक्ती दुबईत 10 ते 15 वर्षं राहत होती -एटीएस'दुबईमधील सीम कार्ड वापरून धमकीचे फोन केले होते'बिहारमध्ये हिंसक जमावाकडून महिलेची निर्घृण हत्यालहान मुलं चोरीच्या संशयातून महिलेला बेदम मारहाणदगडफेकीनंतर बेदम मारहाण करून महिलेची हत्या