पोलीस कर्मचाऱ्याला सलमान बोलला, ‘विचार करा मला तुरुंगात जाऊन कसं वाटत असेल’
सलमानने यावेळी पोलीस अधिकारी निर्मल सिंहना तुरूंगात राहिल्यावर कसं वाटतं असा प्रश्न विचारला

बिग बॉस १२ व्या पर्वाच्या पहिल्या विकेंड का वारमध्ये अनेक गोष्टींवर चर्चा झाली. यावेळी सलमानने अनेक स्पर्धकांना धारेवर धरले. सलमानने अनुप- जसलीन या जोडीला जगातील सर्वात सुंदर कपल म्हटले. या आठवड्यात खूप काही झाले. घरातील तीन जोड्या पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट झाल्या. यावेळी सलमानने मस्करीत आपल्या तुरूंगात जाण्याचा विषय काढला.

विकेंड का वारमध्ये सर्व स्पर्धकांशी सलमान बोलत होता. यावेळी त्याला तीन स्पर्धक दिसले नाहीत. तेव्हा शिवाशीषला त्यांना घरात आणायला बोलावले. हरियाणातून आलेल्या वकील आणि पोलिसांची कॉमनर जोडी सध्या तुरूंगात बंद आहेत. त्यांच्यासोबत टीव्ही अभिनेता करणवीर बोहरा होता. सलमानने यावेळी पोलीस अधिकारी निर्मल सिंहना तुरूंगात राहिल्यावर कसं वाटतं असा प्रश्न विचारला.

त्यावर उत्तर देताना निर्मल म्हणाला की फार वाईट वाटलं. त्याच्या या उत्तरावर सलमान म्हणाला की, मग विचार कर मला कसं वाटलं असेल. त्याच्या या प्रश्नावर सारेच स्पर्धक हसायला लागले.

सलमान खान काळविट शिकार प्रकरणी २४ तासांसाठी जोझपूर तुरुंगात होता. याआधीही तो तुरुंगात गेला आहे. यानंतर सलमान सृष्टीवर चांगलाच भडकला व त्यानंतर तो मस्करी करत असल्याचे म्हणाला.

सृष्टेही यावेळी तिला जसलीन आवडत नसल्याचे मान्य केले. सलमानने घरातील खलनायक कोण असा प्रश्न विचारल्यानंतर १२ स्पर्धकांना सबा खानचं नाव घेतलं.

यानंतर सलमानने श्रीशांतचीही कानउघडणी केली. दीपिकाने सौरभची तक्रार करत तो घरातलं कोणतंही काम करत नसल्याचे सांगितले. यावर सलमान दीपिकाला म्हणाला की, कदाचित दीपिका शोची थीम विसरली आहे.
Tags:
First Published: Sep 23, 2018 01:25 PM IST