मुनमुननंतर आता राजही संतापला; अफेअरच्या बातम्यांवर म्हणाला, 'माझं आयुष्य...'
फरदीन खानला सुरुवातीला वाटलं की त्याला फक्त दोन किंवा तीन वर्षे मुंबईपासून दूर राहावं लागेल. तो म्हणाला, “मला वाटतं जर आयुष्य इतकं सोपं असतं! मुंबईपासून दूर जाण्याचं कोणतंही नियोजन नव्हतं, मी परिस्थितीला सामोरा जात होतो. आता मी दोन सुंदर मुलांसह आनंदी आहे आणि कामापासून दूर आहे. मी त्यांच्यासोबत घालवलेला वेळ सुंदर आहे. माझ्या मुलांमध्ये आणि माझ्यामध्ये एक सुंदर बंध आहे. मी स्वतःला दररोज धन्य मानतो. " फरदीन खान पुढे म्हणाला, “मला देवाचे आभार मानायला खूप काही आहे. मला वाटते की माझ्यावर कामावर परत जाण्याची वेळ आली आहे. माझं कामावर परतणं सुरळीत पार पडले. जेव्हा ते व्हायचे होते तेव्हा ते घडले. परत आल्यावर मला आढळलं की चित्रपटसृष्टीचं संपूर्ण दृष्य बदलेलं आहे. फरदीन खानने स्पष्ट केले की तो बॉलिवूडमध्ये दर्जेदार काम करण्यास तयार आहेत. तो म्हणाला, “मी नेहमीच मुंबई आणि लंडन दरम्यान प्रवास करतो. मी माझा अर्धा वेळ तिथे आणि अर्धा वेळ इथे घालवला. यावेळी मी एका उद्देशाने परत आलो आहे. मला चांगले अर्थपूर्ण काम करायचे आहे. मला वाटतं हा सिनेमाचा नवा सुवर्णकाळ आहे. सिनेमाची अशी विविधता घडताना पाहून उत्साह येतो.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Riteish Deshmukh