मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पुणे हत्याकांडात नवा ट्वीस्ट, भीमा नदीत सापडलेल्या मृतदेहांचं पुन्हा शवविच्छेदन

पुणे हत्याकांडात नवा ट्वीस्ट, भीमा नदीत सापडलेल्या मृतदेहांचं पुन्हा शवविच्छेदन

पुण्यातल्या दौंड तालुक्यातल्या पारगावमध्ये घडलेल्या सामूहिक हत्याकांडानंतर महाराष्ट्र हादरला. आता या हत्याकांडामध्ये नवा ट्वीस्ट आला आहे.

पुण्यातल्या दौंड तालुक्यातल्या पारगावमध्ये घडलेल्या सामूहिक हत्याकांडानंतर महाराष्ट्र हादरला. आता या हत्याकांडामध्ये नवा ट्वीस्ट आला आहे.

पुण्यातल्या दौंड तालुक्यातल्या पारगावमध्ये घडलेल्या सामूहिक हत्याकांडानंतर महाराष्ट्र हादरला. आता या हत्याकांडामध्ये नवा ट्वीस्ट आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

सुमित सोनावणे, प्रतिनिधी

पुणे, 26 जानेवारी : पुण्यातल्या दौंड तालुक्यातल्या पारगावमध्ये घडलेल्या सामूहिक हत्याकांडानंतर महाराष्ट्र हादरला. आता या हत्याकांडामध्ये नवा ट्वीस्ट आला आहे. भीमा नदीत सापडलेल्या सात मृतदेहांपैकी तीन मृतदेहांचं पुन्हा शवविच्छेदन होणार आहे. ससून रुग्णालयाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि पुरलेले मृतदेह पुन्हा उकरून बाहेर काढण्यात आले. या मृतदेहांचं पुन्हा शवविच्छेदन करण्यात येणार आहेत. जिल्हा रुग्णालयाने पहिल्यांदा केलेल्या शवविच्छेदनात बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल दिला होता, पण पोलीस चौकशीत या सात जणांची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं होतं.

पोलीस तपासानंतर आता जिल्हा रुग्णालयाच्या अहवालावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, त्यामुळे ससून रुग्णालयाकडून तीन मृतदेहांचं पुन्हा शवविच्छेदन करण्यात आलं आहे. बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

18 जानेवारी, 20 जानेवारी आणि 21 जानेवारीला मृतदेह मिळाले तेव्हा हे मृतदेह यवतच्या ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. इथल्या डॉक्टरांच्या अहवालात हे मृत्यू बुडून झाल्याचं नमूद करण्यात आलं, त्यामुळे या प्रकरणाचा तपास वेगळ्या दिशेने गेला होता. नंतर मिळालेले मृतदेहांचे अहवाल ससून रुग्णालयात गेले तेव्हा एका अहवालात हत्या झाल्याचं निष्पन्न झालं, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

7 मृतदेह सापडल्याने खळबळ

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात राहणाऱ्या पवार आणि फुलावरे कुटुंबातील महिला आणि पुरुषांचे टप्प्याटप्प्याने सहा दिवसात 7 मृतदेह दौंड तालुक्यातील पारगाव मधील भीमा नदी पात्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या सात हत्या चुलत भावानेच केल्या असल्याचं पोलीस तपासात समोर आलं.

मोहन पवार यांच्या चुलत भावानेच हे खून केल्याचे समोर आले आहे. मोहन पवार यांच्या मुलासोबत चुलत भावाचा मुलगा गेला होता. त्यावेळी त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण ही बाब मोहन पवार यांनी त्याला सांगितल नाही. 4 दिवसांनी मुलाच्या अपघाताची बातमी मारेकरी चुलत भावाला मिळाली. त्यानंतर मुलाचा मृत्यू झाला. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा राग मनात धरून मोहन पवार यांच्यासह कुटुंबीयांची हत्या केली आणि मृतदेह भीमा नदीच्या पात्रात फेकून दिली. मोहन उत्तम पवार ( वय ४८ ), संगिता मोहन पवार (वय ४५), राणी शाम फुलवरे (वय २५), शाम फुलवरे ( वय २८) आणि रितेश फुलवरे (७) कृष्णा फुलवरे (४) छोटू फुलवरे (३) अशी मृतांची नाव आहे.

तर, अशोक कल्याण पवार (वय 40), श्याम कल्याण पवार (वय 30 ), प्रकाश कल्याण पवार (वय 32) आणि आणखी एक त्यांचा भाऊ अशा चौघांना ताब्यात घेतले आहे. मृतक मोहन पवार यांचे आरोपी हे सख्खे चुलत भाऊ आहेत.

दरम्यान, सासरे मोहन उत्तम पवार आणि संगीता मोहन पवार हे दोघे पति पत्नी असून राणी शाम फुलवरे आणि शाम फुलवरे हे पवार यांची मुलगी आणि जावई असून त्यांना तीन मुले असा एकत्र परिवार अहमदनगर जिल्ह्यातील निघोज गावात राहत होते. अचानक भीमा नदी पात्रात त्यांच्या लहान मुलांसहित मृतदेह मिळून आले त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. यामध्ये मोहन पवार यांच्या दुसऱ्या मुलाचे एका विवाहित महिले सोबत प्रेम संबंध होते. त्यारागापोटीच घातपात केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

First published:

Tags: Crime, Pune