पाटना, 21 फेब्रुवारी : नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांना काहीच कमू पडू नये असं प्रत्येक मुलीच्या बापाची इच्छा असते. मात्र अनेकदा काहीतरी राहून जातं. यानंतर काही मंडळी नवरीच्या बापाला बोलणी लावतात. अनेकदा लग्न (Daughters Marriage) तोड़ून भर मंडपातून निघून गेल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना बिहारमधील (Bihar News) पूर्णिया येथून समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बिहारमधील पूर्णिया भागातील आहेत. येथे लग्न समारंभात नवऱ्याच्या वरातीला जेवण देण्यास उशीर झाल्यामुळे नवरदेवाने असा निर्णय घेतला ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही. लग्न समारंभात वऱ्हाड्यांना उशिरा जेवण मिळाल्यामुळे नाराज नवरदेव आणि त्याच्या वडिलांनी सर्व वऱ्हाड्यांना परतायला सांगितलं. स्वत:देखील आपल्या नातेवाईकांसह लग्न न करता निघून गेले. दारातून मुलीच्या लग्नाची वरात निघून गेल्यामुळे तिच्या आई-वडिलांना जबर धक्का बसला आहे. या सर्व प्रकारानंतर नवरीच्या कुटुंबीयांनी नवऱ्या मुलाच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
हे ही वाचा-मोबाइलमुळे संसाराची झाली राख-रांगोळी; नागपुरात विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
वऱ्हाड्यांना जेवण द्यायला थोडा उशिर झाला म्हणून नवरदेव आणि त्याच्या वडिलांना राग आला. ज्यानंतर ते आपल्या सर्व नातेवाईकांसह लग्न न करता निघून गेले. दुसरीकडे या घटनेनंतर स्थानिक लोक प्रतिनिधींना नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांची समजूत काढली तरी ते ऐकण्यास तयार नसल्याचं सांगितलं जात आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.