राज्य शिक्षण बोर्डाबरोबर काही राष्ट्रीय शिक्षण बोर्ड आणि काही आंतरराष्ट्रीय शिक्षण बोर्डाचे विद्यार्थीही आहेत. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या राज्याने संबंधित राज्यातील विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेतल्यास तो त्यांच्या करिअर आणि भविष्यातील संधीच्या दृष्टीने त्यांच्यासाठी तोट्याचा ठरू शकतो, अशी शक्यताही अरविंद सावंत यांनी व्यक्त केली. MPSC नंतर दहावी-बारावी परीक्षाही पुढे ढकलणार का? पाहा काय म्हणाल्या शिक्षणमंत्री या सर्वाचा विचार करून केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानं संपूर्ण देशाच्या वतीनं पुढाकार घेऊन, सर्व विद्यार्थ्यासाठी एक समान धोरण ठरवावं, अशी विनंती सावंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरीयाल यांच्याकडं केली आहे. यावर लवकरात लवकर विचार करून निर्णय घ्यावा अशी विनंतीही त्यांनी केली आहे.Request to take uniform policy decision for the ensuing exams for Std. 10th & 12th. Kind attn : @DrRPNishank ji Hon. Cabinet Minister for Education, GoI ---@CMOMaharashtra @OfficeofUT @AUThackeray @ShivsenaComms @ShivSena pic.twitter.com/uR51ilMIIf
— Arvind Sawant (@AGSawant) April 10, 2021
राज्य सरकारनं नुकत्याच राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा पुढं ढकलंत त्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. पण दहावी-बारावीच्या परीक्षांवर कोरोनाची टांगती तलवार असल्यानं नेमकं काय होणार, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता केंद्र सरकार याविषयी हस्तक्षेप करणार का हेही पाहावं लागेल. दरम्यान, राज्यात एमपीएससीच्या परीक्षा पुढं ढकलल्यानंतर कोरोनाचे गांभीर्य विचारात घेऊन वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षाही पुढं ढकलण्याची मागणी मंत्री बच्चू कडू यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.राज्यात कोरोना वाढीची तिव्रता विचारात घेऊन वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या हि विनंती..@AmitV_Deshmukh @CMOMaharashtra pic.twitter.com/dLUxdiAW8r
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) April 10, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.