महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल (Maharashtra HSC Result 2021) यंदा 99.63 टक्के लागला आहे. यंदा राज्यातील एकूण 13 लाख 80 हजार विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी (HSC Result 2021 Maharashtra board website) नोंदणी केली. या विद्यार्थ्यांची परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात करण्यात आली होती. यंदा विज्ञान शाखेचा 99.55 टक्के निकाल लागला आहे. कला शाखेचा 99.83 टक्के तर वाणिज्य शाखेचा 99 .91 तयेक निकाल लागला आहे.
दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीनं (Special Assessment system) लावण्यात येणार आहे. 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्त्येकी 30 टक्के वेटेज आहे. तसंच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा, असायमेन्टस यांना 40 टक्के वेटेज असणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे.