सचिन जिरे,प्रतिनिधी
औरंगाबाद, 23 मे : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात बांधाच्या वादावरून शेतकरी (Farmer) कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र, दोन दिवस उलटूनही मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील हातनूर गावात ही घटना घडली. कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.
#औरंगाबाद :बांधांच्या वादावरून शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण, कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना pic.twitter.com/2FCByZyCUZ
— News18Lokmat (@News18lokmat) May 23, 2021
नारायण काळे यांच्याकडे थोडीफार शेती आहे. शेतातील बांधावरून आरोपी कुटुंबासोबत नेहमी वाद होत होता. दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा शेतातील बांधावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला. काळे कुटुंबीयांना शिवीगाळ करत ठिबक सिंचनचे पाईप उपसून फेकून दिले. त्यानंतर वाद आणखी चिघळला आणि नारायण काळे यांना मारहाण करण्यात आली.
एवढंच नाहीतर पुरुषांसह महिलांनाही देखील बेदम मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. महिलांना लाथा बुक्याने मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिसात काळे कुटुंबाने धाव घेतली.
पण मारहाण होऊन दोन दिवस उलटले तरी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. राजकीय दबावातून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा पीडित काळे कुटुंबाने आरोप केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Aurangabad News, औरंगाबाद