मुंबई, 31 मे : राज्यात मागच्या तीन वर्षांचा पावसाचा (rain alert) अंदाज घेता ठाकरे सरकार (thackeray government) लवकरच पूर्व तयारी करत आहे. दरम्यान मागच्या तीन वर्षात महापूर (flood) आणि पावसाने पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अन्य जिल्ह्यात पावसाने थैमान घातले होते. यामुळे वित्तहाणीसोबत जिवीतहाणी मोठ्या प्रमाणात झाली होती. यासाठी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) हे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांनी केलेल्या नियोजनाची माहिती घेत पावसाळ्यात काय उपाययोजना करता येतील याबाबत सूचना केल्या.
पूर नियंत्रणाच्या दृष्टीने धरणातून किती पाणी कसे सोडण्यात येत आहे ते सर्वसामान्यांना रियल टाईम कळावे म्हणून जलसंपदा विभागाने यंत्रणा विकसित केली आहे. त्याद्वारे धरण क्षेत्र परिसरातील नागरिकांना आगाऊ सूचनाही मिळणार आहेत. विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती ही माहिती जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवरून 15 जूनपासून लाईव्ह पाहू शकतो. तंत्रज्ञानाचा अवलंब करून ही यंत्रणा उभारल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत जलसंपदा विभागाचे कौतुक केले. गेल्या वर्षी चिपळूण पुरानंतर (chiplun flood) आपण आढावा घेऊन यासंदर्भात दिलेल्या सूचनेप्रमाणे ही यंत्रणा सुरू होत आहे. याचा निश्चित उपयोग होईल असे सांगितले.
हे ही वाचा : परदेशी सौंदर्याचं कौतुक करा! पण आपला देश एका परक्याच्या नजरेतून बघा एकदा, नव्याने पडाल प्रेमात
पावसाळयात नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढत असून ऐनवेळी मदत व बचावकार्य करण्याची वेळ येऊ नये म्हणून प्रथमच एनडीआरएफच्या 9 तुकड्या 7 जिल्ह्यांमध्ये अगोदरपासूनच तैनात करण्यात आल्याची माहिती आज मान्सूनपूर्व आढावा बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापनाने दिली.
ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी दोन तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर येथे प्रत्येकी एक टीम 15 जूनपासून पोहोचतील. याच पद्धतीने राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एसडीआरएफची एक तुकडी नांदेड व एक तुकडी गडचिरोली येथे 15 जून ते 15 सप्टेंबर या कालावधीत तैनात करण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा रीतीने पूर्व नियोजित पद्धतीने केलेल्या व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले.
हे ही वाचा : महाविकास आघाडी सरकामध्ये काँग्रेस नाराज, बाळासाहेब थोरातांनी दिले नवे संकेत
पावसाळयात धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग हा नेहमीच महत्वाचा मुद्दा असतो. पूर नियंत्रण जलसंपदा विभागाचे अधिकारी नियोजनाने व्यवस्थितरित्या पार पाडू शकतात. त्यादृष्टीने संबंधित अभियंत्यांनी या काळात कोणत्याही परिस्थितीत धरणाच्या जागेवरच राहावे आणि मुख्य अभियंता यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय अजिबात मुख्यालय सोडू नये असे निर्देश आजच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Chiplun, Rain flood, Uddhav tahckeray